Sunday, June 20, 2010

मैत्री

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवणहा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातातजशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात.

इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तरआयुष्य खूप सुंदर
आहेबघायला गेलं तर
दु:खातही सुख आहेजगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहेवाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहेजपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहेसोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहेकुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहेपचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहेउमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहेशरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होतेफुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतंकापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागतेहास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहेविज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहेइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहेविचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरतेसुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलंत्या भाग्यवंतांचं ठीक आहेउरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पणअगणित उत्तरांचं पीक आहे

No comments:

Post a Comment