Thursday, July 25, 2013

पहिला पाऊस आणि ती

पहिला पाऊस आणि ती
आठवणी घेऊन जुन्या
येरे तू पावसा ,
तिला पाहण्यासाठी
जीव जाला वेडा पिसा...!!!

थंड हवा आणि ढगाळ वातावरण
हे आहेत तुझा येण्याची लक्षण,
थंड हवा म्हणजे अंगावर शहारा
आणि वातावरण जसे मनावर दडपण...!!!

जसे जसे ढग जवळ येऊ लागतात
अचानक पोटात गोळा येतो,
कारण मनाला ते ढग बरसावे तर वाटतात
पण ढगांचा दुरवा नको वाटतो...!!!

आकाश आता पूर्ण काळे जाले
कोणत्याही क्षणी ते बरसतील,
आठवणीने डोळ्यात केलेले
घर ते नकीच वाहून नेतील...!!!

पहिला थेंब गालाला स्पर्श करताच
अंगात आनंदाची लाट दरवळत असे,
तो स्पर्श नेहमीच
तिचा नाजूक बोटांची आठवण देत असे...!!!

आजकाल लोकांना म्हणे पाऊस आवडत नाही
म्हणतात भिजायला आवडत नाही,
त्यांना काय माहित छत्री असूनही
तिचा बरोबर भिजण्याचा आनंद कशातही नाही...!!!

हळू हळू आवाज व्हाडू लागतो
म्हणे पाऊस जोर धरतोय ,
तो तर तिचा दरवाजा आपटत असतो
सांगायला तुजी कोणी आठवण काढतोय...!!!

काही क्षणात वातावरण
शांत होते,
जाताना मनातल्या आठवणींचा रोपाला
पाणी देऊन जाते...!!!

पहिला पाऊस नेहमी
मातीचा सुगंद घेऊन येतो,
त्याच बरोबर जाताना
काही जुन्या आठवणी जाग्या करून जातो...!!!

Tuesday, July 9, 2013

मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना...

भिती वाटते कोणाला आपल
बनवायची...
भीती वाटते काही वचने
निभवन्याची...
प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते....
विसरन्याची...
खुप ञास होतो जवळचे दूर
होताना .....
म्हणूनच मन घाबरतं
आता कुणालाही जवळ करताना....

Tuesday, June 25, 2013

काहीच कसं वाटत नव्हतं ...

तेव्हा तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त..
आपल्या पहिल्या भेटीत एक नातं जडलं होतं
आता मला माहित नाही पण तेव्हा तुला माझ्या बद्दल काहीतरी वाटतं होतं
मी ही म्हणून धाडस केलंहोतं
आज तेच नातं तोडताना तुझ्या डोळ्यात साधं पाणी ही न्हवत...

आपल्या प्रत्येक भेटीत आपण एक नवीन स्वप्नांचं घर बांधलं होतं,
आज तीच स्वप्ना उधळताना तुला काहीच वाटत न्हवत,
नेहमी भेटल्य्वर घट हाथ धरणारी तू
आज तोच हात सोडताना माझ्या कडे तुझ्या डोळ्यांनी पाहिलं ही न्हवत ...

नेहमी तासन तास बोलणारी तू
अन " उद्या करशील ना रे फोन " असं बजावणारी तू
आज माझ्याशी कायमचा अबोला धरताना
तुला काहीच कसं वाटत नह्व्त...

एव्हढाच मी जर नकोसा होतो तर
आधी होकार का दिलास
अन एका वाटेवर आपण सुखाने चालत असताना
अर्ध्या वाटेवर माझी साथ सोडताना
तेव्हा तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त...

काहीच कसं वाटत नव्हतं ...

कवी- एक तुटलेलं हृदय!

Monday, June 17, 2013

मन वेडं

मन वेडं,

प्रत्येकाच असतं
कुणाच कमी,
कुणाच जास्त असत..
मन वेडं...

...कधी ना कधी नक्की फ़सतं
कुणाच रडत बसतं
कुणाच उगाचच् हसतं
मन वेडं...

हे खुप नशीबवान असतं
आपल्याच नकळत हे तिच्यासोबत असतं
मन वेडं...

हे पाखरां सारख असतं
ते पंखाने उडत असतात
हे मात्र
पंखाविना उडत असतं
मन वेडं...

हे कधीच आपलं नसत
ते फ़क्त तिचच असत
कधी हरवल तर्
तिच्या सावली मागे सापडतं....
मन् वेडं

प्रत्येकाच असतंकुणाच कमी
कुणाच जास्त असत.....

Tuesday, February 26, 2013

प्रेम म्हणजे काय रे भाऊ?


मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय?

मी त्याला सागितले की ...

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचारणारी बहिण म्हणजे प्रेम.

पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको ... म्हणजे प्रेम!

कुणाचा मेल ला रिप्लाय येवो अगर न येवो, तरीही मित्राना नियमितपणे मेल पाठवीत रहाणारा मित्र म्हणजे प्रेम!